मी जन्मले तेव्हाच
आमचं नात जुळलं होत
मी जगत होते फक्त त्याच्यासाठी
झुरत होते त्याच्या बाहूत विसावण्यासाठी
कारण मला माहीत होत
तो नक्की येणार होता
हात धरून माझा मला दूर नेण्यासाठी
त्याची वाट बघताना,
मी त्याला विसरायला लागले
जीवनाच्या धाग्यात अशी गुरफटायला लागले
त्याच्या आठवणींना मी घाबरायला लागले
आता त्याच्यापासून लांब धावायला लागले
पण जेव्हा तो आला,मला कवटाळण्यासाठी
वाटले द्यावा नकार त्याला,त्याच्या बरोबर जाण्यासाठी
पण त्याचा काही एक उपयोग नव्हता
कारण मनुष्य जन्मतोच मरण्यासाठी...
-- अश्विन
© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा