आजच साचेबंद आयुष्य, उद्या वेगळंच होऊन जाईल
नवीन दिवस नवीन बदल, आणि सगळंच बदलून जाईल
बदलेल हवा, बदलेल पाणी, बदलतील पाखरांची गाणी
तोच मी, तेच मन, नवीन जगात हरवून जाईल
आला आला म्हणता म्हणता, हाही बदल सरून जाईल
काही सुटतील, काही उठतील
प्रश्न नवे, नवी समीकरणे जुळतील
समीकरणाच्या दोन्ही बाजू हळूहळू जुळून येतील
आला आला म्हणता म्हणता हाही बदल सरून जाईल
पुन्हा सांधेल घडी सबंध, अगदी व्यवस्थित साचेबंद
जणू अखंडित अशीच असावी, बदलाची कोणी खूण नसावी
आणि कधी मग असा अचानक
दैव फासा टाकून जाईल
नवीन दिवस, नवीन बदल
आणि आयुष्यच बदलून जाईल -- अश्विन
© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा