रेतकण मुठीतूनी जैसे निसटुन गेले
सुख शोधता शोधता सुख हरवून गेले
एक घार पिल्लांसाठी अन्न आणायास गेली
मागे राहिले घरटे, खुप दूर दूर गेली
अन्न मिळाले खुपसे, घर हरवून गेले
एका उन्हाळी दुपारी, नारळास लागे तहान
पाणी गोड़ शोधी पाही, तळी मोठी लहान
हिंडता फिरता पूर्ण सुकुनिया गेले
सुख अंतरीच आहे, पाही चाचपूनी मन
नाही नसल्याची हाव, असल्याचे समाधान
जो घेत घेत आला, तो का रे सदा दुःखी
ज्याने वाहिले सर्वस्व, सुख त्याचा दास झाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा